भारत-ब्राझील द्विपक्षीय संबंधांना चालना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा

 

भारत आणि ब्राझील यांचे एकमत आहे की सर्व जागतिक समस्यांचे निराकरण संवादातून व्हावे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ब्रासिलियात व्यक्त केले. भारत आणि ब्राझीलमधील द्विपक्षीय चर्चेनंतर बोलताना मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांना भारत-ब्राझील सामरिक भागीदारीचे 'प्रमुख शिल्पकार' संबोधले. त्यांना ब्राझीलचा सर्वोच्च राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

पंतप्रधानांनी सांगितले की भारत-ब्राझील सहकार्य हे जगासाठी महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. "भारत आणि ब्राझील नेहमीच जागतिक पातळीवर एकमेकांशी समन्वयाने काम करतात. दोन मोठे लोकशाही देश म्हणून आमचे सहकार्य केवळ ग्लोबल साऊथसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी महत्त्वाचे आहे,” असे मोदी यांनी सांगितले. 

ग्लोबल साऊथच्या हितांचे रक्षण करण्यात भारत आणि ब्राझीलची भूमिका अधोरेखित केली. यापूर्वी, पंतप्रधानांना ब्रासिलियात औपचारिक स्वागत झाले. ते सोमवारी रियो डी जनेरो येथील ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहिल्यानंतर तिथे पोहोचले. 

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज जग तणाव आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. माझे मित्र (राष्ट्राध्यक्ष लुला) यांनी याबाबत सविस्तर सांगितले. मी त्याची पुनरुक्ती करत नाही. भारत-ब्राझील भागीदारी स्थिरता आणि समतोलासाठी महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्व वाद संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवावेत, यावर आमचे एकमत आहे.” 

दहशतवाद हा सहकार्याचा एक क्षेत्र आहे, यावर 'शून्य सहनशीलता आणि शून्य दुहेरी मानके' असावीत, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी ब्राझीलचा सर्वोच्च पुरस्कार, ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस, राष्ट्राध्यक्ष लुलांकडून स्वीकारल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली. भारत-ब्राझील संबंध बळकट करण्यात लुलांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी आभार मानले. “आजच्या चर्चेत आम्ही प्रत्येक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत बोललो. पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

सहा करारांवर स्वाक्षऱ्या
दोन्ही देशांनी सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. यात ऊर्जा, दहशतवादविरोधी सहकार्य, बौद्धिक संपदा, कृषी आणि गोपनीय माहितीचे संरक्षण यांचा समावेश आहे. “ऊर्जा क्षेत्रातील आमचे सहकार्य सतत वाढत आहे. पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जा हे दोन्ही देशांचे मुख्य प्राधान्य आहे. आज झालेल्या करारामुळे या क्षेत्रातील सहकार्याला नवी दिशा आणि गती मिळेल,” असे मोदी यांनी सांगितले. 

संरक्षण क्षेत्रातील सहकार्य हे परस्पर विश्वासाचे लक्षण आहे, असे त्यांनी वर्णन केले. “आम्ही आमच्या संरक्षण उद्योगांना जोडण्याचे प्रयत्न सुरू ठेवू,” असे पंतप्रधानांनी जाहीर केले. दोन्ही देश यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) ब्राझीलमध्ये स्वीकारण्यासाठी एकत्र काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.