पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटना स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमधील एअर इंडिया विमान दुर्घटना स्थळाला भेट दिली. या दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहचताच त्यांनी तातडीने मेघनीनगर परिसरातील दुर्घटना स्थळाकडे प्रयाण केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल त्यांच्यासोबत होते.
काल दुपारी लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा अपघात झाला. या विमानात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश होता. विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते बी.जे. मेडिकल कॉलेजच्या संकुलात कोसळले. या दुर्घटनेत फक्त एक व्यक्ती वाचली. विमानात २३२ प्रवासी आणि १० कर्मचारी होते. यापैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, सात पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होते.
दुर्घटना विमानतळाच्या बाहेरील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या संकुलात घडली. यात चार एमबीबीएस विद्यार्थी आणि एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाला. पंतप्रधानांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले. या दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत जाहीर केली आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter