बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत यांच्या दुखापतीबाबत माहिती दिली. शमीचे पुनरागमन सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता असून रिषभ पंत यंदाचा आयपीएल मोसम खेळणार असल्याचे जय शहा यांनी स्पष्ट केले.
जय शहा म्हणाले की, शमीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या तो भारतामध्ये आहे. भारत- बांगलादेश यांच्यामध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात मालिका होणार आहे. या मालिकेने त्याचे पुनरागमन होऊ शकते.
तसेच के. एल. राहुलही तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. रिषभ पंतने फलंदाजी व यष्टिरक्षणाचा सराव सुरू केला असून तो भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. फलंदाजीसोबत त्याने यष्टिरक्षणही केल्यास टी-२० विश्वकरंडकासाठी त्याचे संघात पुनरागमन होऊ शकते.