बकरी ईदनिमित्त देशभरातील प्रमुख मुस्लीम मौलवींनी केले ‘हे’ आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
भारतातील मुस्लिम विचारवंत
भारतातील मुस्लिम विचारवंत

 

आवाज द व्हॉइस, नवी दिल्ली 

ईद-उल-अजहाच्या निमित्ताने देशातील अनेक प्रमुख उलेमा आणि मजहबी रहनुमांनी मुस्लिमांना एक महत्त्वाची गुजारिश केली आहे. कुर्बानी देताना मजहबी जिम्मेदारीसोबतच सामाजिक संवेदनशीलतेचंही पूर्ण भान ठेवावं, असं त्यांनी म्हटलं आहे. उलेमांनी स्पष्ट केलं, कुर्बानी ही इस्लाममधील एक महान इबादत आहे. पण ती अदा करताना इतर धर्माच्या लोकांच्या भावनांचा आणि देशाच्या कायद्याचा आदर करणंही तितकंच जरुरी आहे. सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्सचं मुकम्मल पालन करावं आणि ज्या प्राण्यांना कानूनने इजाजत दिली आहे, त्यांचीच कुर्बानी द्यावी, असंही त्यांनी सांगितलं.

उलेमांनी आणखी एक महत्त्वाची बात सांगितली. इस्लाममध्ये कुर्बानीसाठी बकरा, मेंढी, दुम्बा आणि म्हैस असे अनेक पर्याय मौजूद आहेत. त्यामुळे कानूनचे पालन करून ही इबादत अतिशय सहजपणे पूर्ण करता येते. यासोबतच सोशल मीडियाचा वापर करताना खास काळजी घेण्याचं अपीलही करण्यात आलं. कुर्बानीचे फोटो आणि व्हिडीओ अजिबात शेअर करू नका. यामुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया शेख अबू बकर अहमद यांनी कालिकत येथील मरकजुस्सकाफतुस्सुन्नियाच्या मुख्य परिसरातून देशवासियांना ईद-उल-अजहाची मुबारकबाद दिली. कुर्बानीच्या या सणात मुस्लिमांनी इतर समाजांच्या भावनांची खास काळजी घ्यावी, असं अपील त्यांनी केलं.

हा पवित्र सण आपल्याला कुर्बानी, त्याग, मोहब्बत, भाईचारा आणि इंसानियतच्या खिदमतचा पैगाम देतो. हजरत इब्राहिम (अ.) आणि हजरत इस्माईल (अ.) यांची महान कुर्बानी संपूर्ण इंसानियतसाठी सबर आणि ईमान याची मिसाल आहे, असं ते म्हणाले.

शेख अबू बकर अहमद यांनी पुढे सांगितलं की, कुर्बानीसारखा पवित्र फर्ज पार पाडताना पूर्ण काळजी घेतली पाहिजे. कुर्बानीच्या प्राण्यांचे किंवा कत्तलीचे फोटो सोशल मीडियावर अजिबात शेअर करू नयेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे ध्यान देऊ नये. आपली एक छोटीशी चूक समाजकंटकांना माहोल खराब करण्याचा मौका देऊ शकतं.

कुर्बानीचे रक्त, उरलेले अवशेष आणि कचरा गटारात किंवा रस्त्यावर फेकू नये. त्याऐवजी ते योग्य ठिकाणी पुरावं. ईद-उल-अजहा आपल्याला अल्लाहाच्या मर्जीसाठी आपली सर्वात अझीझ गोष्ट अर्पण करण्याचा पैगाम देते. या निमित्ताने समाजात मोहब्बत, भाईचारा आणि इंसानियत वाढीस लागली पाहिजे. सणाच्या काळात साफसफाई आणि वीजपुरवठ्याचा चांगला इंतजाम करण्यासाठी त्यांनी प्रशासनालाही आवाहन केलं.

कानूनच्या दायऱ्यात राहून सण साजरा करा : रेहान अख्तर कासमी

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक रेहान अख्तर कासमी म्हणाले, हिंदुस्थानात कुठेही कोणी गाईची कत्तल करत नाही आणि तसे होऊही नये. सरकारने ज्या गोष्टींवर पाबंदी घातली आहे, त्या सर्व कायद्यांचे पालन करूनच सण साजरा करावा.

काही लोक गाईच्या मसल्यावरून ज्या गोष्टी बोलतात, त्या पूर्ण मालूमातअभावी बोलतात. कारण हिंदुस्थानात मुस्लिम आता गाईकडे आदराने पाहतात. देशातील बहुसंख्य आवाम गाईला मजहबी आणि तहजीबी प्रतीक मानतात, हे यामागचं मुख्य कारण आहे.

रेहान कासमी यांनी स्पष्ट केलं की, सरकारने ज्या प्राण्यांना इजाजत दिली आहे, त्यांचीच मुस्लिमांनी कुर्बानी द्यावी. सरकारने दिलेल्या नियमांनुसारच कुर्बानीचा अमल पूर्ण करावा. कारण कुर्बानी ही एक महत्त्वाची मजहबी इबादत आहे. कायदा आणि सामाजिक भाईचारा या दोन्ही गोष्टींचा आदर करणं जरुरी आहे.

मुस्लिमांनी गाईडलाइन्सनुसारच कुर्बानी करावी : मुफ्ती मुकर्रम अहमद

फतेहपुरी मशिदीचे इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद म्हणाले, मुस्लिम कधीही गाईची कुर्बानी करत नाहीत आणि असं केलंही जाऊ नये. मुस्लिमांची गाईशी कोणतीही दुश्मनी नाही. तसेच कोणत्याही मुस्लिमाला गाईची कुर्बानी करण्याचा शौक नसतो.

मुस्लिम समाज नेहमीच इतर समुदायांच्या मजहबी भावनांचा आदर करतो. मुल्कातील बहुसंख्य आवाम गाईला मजहबी प्रतीक मानतात. त्यामुळे मुस्लिमही तिचा आदर करतात.

इस्लाममध्ये कुर्बानीसाठी बकरा, मेंढी, दुम्बा आणि म्हैस यांसारखे दुसरे प्राणी मौजूद आहेत. सरकार या प्राण्यांना इजाजत देतं. त्यामुळे मुस्लिमांनी याच प्राण्यांची कुर्बानी द्यायला हवी, असं मुफ्ती मुकर्रम अहमद म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांकडून गाईला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी होत आहे. स्वामी अग्निवेश यांनीही या मागणीला पाठिंबा दिला होता, याची याद त्यांनी करून दिली.

गोरक्षणाच्या नावाखाली होणारी हिंसा आणि मॉब लिंचिंगच्या घटनांबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. मोहम्मद अखलाक आणि पैलू खान यांसारख्या प्रकरणांचा त्यांनी आवर्जून जिक्र केला. गोरक्षणाच्या नावाखाली गुंडागर्दी करणाऱ्या समाजकंटकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीका केली आहे. सरकारने यावर एखादा कायदा बनवला, तर मुस्लिम समाजही त्याचं पालन करेल, असं ते म्हणाले.

'कुर्बानीची पाकीजगी राखा : मौलाना झहीर अब्बास रिझवी'

मुल्कातील मशहूर आलिम मौलाना झहीर अब्बास रिझवी यांनी मुंबईत एक महत्त्वाचं विधान केलं. ईद-उल-अजहाच्या मौक्यावर सर्वांनी खूप काळजीपूर्वक वागायला हवं. एकीकडे इतर समुदायांच्या भावनांचा आदर केला पाहिजे आणि दुसरीकडे इस्लामने साफसफाईला अर्धं ईमान मानलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

कुर्बानीसोबतच आपल्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात साफसफाईची खास दक्षता घ्यावी. कारण पाकीजगी हीच आपल्या धर्माची ओळख आहे, असं ते म्हणाले.

प्राण्यांच्या बाबतीत सरकारी नियमांचं पालन केलं जावं. ज्या प्राण्यांवर पाबंदी आहे, त्यांचा कुर्बानीसाठी वापर करू नये. आपण आपल्या वागणुकीतून आणि चांगल्या चारित्र्यातून लोकांची मनं जिंकली पाहिजेत, असा मश्वरा मौलाना झहीर अब्बास रिझवी यांनी दिला.

कुर्बानीचा खरा फलसफा आणि पैगाम समजून घेणं जरुरी आहे. तिला केवळ दिखाव्याचा जरिया बनवू नये. कुर्बानीमागे अल्लाहावरील मोहब्बत आणि समर्पणाचा पैगाम दडलेला आहे. त्यामुळे इस्लाम आणि त्याच्या तालीमची तसवीर खराब होईल, असं कोणतंही काम करू नये.

लोकांच्या भावनांचा आदर करा : मुफ्ती मंजूर झियाई

मुफ्ती मंजूर झियाई यांनी आपल्या निवेदनातून लोकांना मोठं अपील केले. कुर्बानीचे प्राणी खरेदी करताना सरकारच्या नियमांचं आणि स्थानिक सोसायटीच्या नियमांचं पालन करावं. लोक ज्या भागात किंवा सोसायटीत राहतात, तिथल्या पर्यावरणाचा आणि लोकांच्या भावनांचा आदर करणं, ही प्रत्येक नागरिकाची जिम्मेदारी आहे.

कुठल्याही व्यक्तीला प्राणी किंवा आपल्या वागणुकीमुळे तकलीफ होता कामा नये. एखाद्या विशिष्ट प्राण्यासाठी जिद्द करण्यापेक्षा, शरीयत आणि कानून या दोन्ही गोष्टींनी इजाजत दिलेल्या प्राण्यांचीच निवड करावी.

मुफ्ती मंजूर झियाई यांनी स्पष्ट केलं की, सरकारच्या हिदायतींचं पालन करणं ही आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे. देशात अमन, भाईचारा आणि कायदा व सुव्यवस्था राखणं, हा प्रत्येक नागरिकाचा फर्ज आहे.

कुर्बानीचा खरा मकसद अल्लाहाची रजा मिळवणं हा आहे. दिखावा करणं किंवा कोणाच्या भावना दुखावणं, हा नाही.

त्यांनी लोकांना एक महत्त्वाचा मश्वरा दिला. कुर्बानीनंतर खुनाने माखलेल्या कपड्यांनिशी किंवा सुऱ्या घेऊन रस्त्यावर आणि बाजारात फिरू नये. साफसफाई, तहजीब आणि शराफतची पूर्ण काळजी घ्यावी. यातून इस्लामचा चांगला पैगाम मुआशऱ्यापर्यंत पोहोचेल. शेवटी त्यांनी अल्लाहाकडे दुआ केली. अल्लाह सर्व मुस्लिमांच्या कुर्बानीला कबूल करो आणि देशात मोहब्बत, अमन आणि भाईचारा वाढीस लागो.

गाईची कुर्बानी करू नका; ईदगाह आणि मशिदींमध्येच नमाज अदा करा : मौलाना खालिद रशीद फरंगी महली

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मेंबर आणि इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी ईद-उल-अजहाच्या मौक्यावर मुस्लिमांसाठी १२ कलमी एडव्हायझरी जारी केली आहे. ईद-उल-अजहा शांततापूर्ण, कायदेशीर आणि साफ मार्गाने साजरी करण्याचं अपील त्यांनी केलं.

ज्या प्राण्यांवर कायदेशीर पाबंदी नाही, त्यांचीच कुर्बानी द्यावी. गाईची कुर्बानी अजिबात करू नये. कारण ते देशाच्या कायद्याच्या खिलाफ आहे. फरंगी महलच्या उलेमांनी १९२० मध्येही गाईच्या कत्तलीविरुद्ध फतवा काढला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

मौलाना खालिद रशीद फरंगी महली पुढे म्हणाले, नमाज सार्वजनिक ठिकाणी अदा करू नये. ती केवळ ईदगाह आणि मशिदींच्या आतच पढावी. तसेच कुर्बानीच्या वेळी साफसफाई, आरोग्य आणि पर्यावरणाच्या नियमांची पूर्ण काळजी घ्यावी.

प्राण्यांचे अवशेष उघड्यावर फेकू नयेत. महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या व्यवस्थेनुसार त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. कुर्बानी फक्त मुकर्रर ठिकाणीच द्यावी. यामुळे सामान्य आवामला कोणतीही तकलीफ होणार नाही आणि सुव्यवस्था टिकून राहील.

ईद-उल-अजहाच्या मौक्यावर देशाच्या हिफाजत, तरक्की आणि खुशहालीसाठी खास दुआ करा. उष्णतेच्या लाटेपासून सुकून मिळण्यासाठी आणि देशाची आर्थिक संकटातून सुटका होण्यासाठीही दुआ करा, असं अपील त्यांनी केलं.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter