Kailash Manasarovar Yatra Concludes: १०व्या आणि अंतिम यात्रेकरूंचा गट स्वदेशी परतला, यंदा ४७७ जणांनी घेतला सहभाग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 3 h ago
उत्तराखंडमधील लिपुलेख पासमधून परतणारे कैलास मानसरोवर यात्रेकरू
उत्तराखंडमधील लिपुलेख पासमधून परतणारे कैलास मानसरोवर यात्रेकरू

 

पिथौरागढ 

उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील लिपुलेख पासवरून (Lipulekh Pass) यात्रेकरूंच्या दहाव्या आणि अंतिम तुकडीच्या आगमनासह यंदाची कैलास मानसरोवर यात्रा (KMC) रविवारी यशस्वीरित्या संपन्न झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हद्दीतील यात्रेची नोडल एजन्सी असलेल्या कुमाऊं मंडल विकास निगमच्या (KMVN) धारचुळा बेस कॅम्पवरील अधिकृत स्रोतांनी सांगितले की, ४४ सदस्यांची अंतिम तुकडी सकाळी ९:२० वाजता लिपुलेख पास ओलांडून भारतात परतली.

धारचुळा बेस कॅम्पचे प्रभारी धन सिंह बिष्ट यांनी माहिती दिली की, "यंदाच्या कैलास मानसरोवर यात्रेत १५४ महिलांसह एकूण ४७७ यात्रेकरूंनी सहभाग घेतला होता." पावसामुळे रस्त्यांची स्थिती खराब झाल्यामुळे शेवटच्या तुकडीला नियोजित बुंडी कॅम्पवर विश्रांती देण्याऐवजी थेट धारचुळा येथे आणण्यात आले, असे बिष्ट यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाद्वारे दरवर्षी जून ते ऑगस्ट/सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडमधील लिपुलेख पास आणि सिक्कीममधील नातू ला पास या दोन वेगवेगळ्या मार्गांनी यात्रेचे आयोजन केले जाते. यावर्षी ५ जुलै रोजी कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाली होती.