कैलास मानसरोवर यात्रा सुरू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पाच ते सहा वर्षाच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा सुरू झाली. ३६ जणांचा भारतीयांचा पहिला जथा सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पोचला असून आज सकाळी या जत्थ्याने पुढचा प्रवास सुरू केला. पहिल्या जाच्यातील ३६ भाविकांत २३ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. कैलास मानसरोवरला दोन मागनि जाता येणार असून हा जया सिक्कीमच्या नयु खिंडीमार्गे तिबेटच्या शिगात्से शहरातून कैलास पर्वत आणि मानसरोवर येथे दाखल होईल. 

कैलास मानसरोवर यात्रा १५ जून ते २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत चालणार आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी यंदा ७५० भारतीय भाविकांची निवड करण्यात असून त्यापैकी ५०० भाविक नथू खिंड मागनि दहा-दहा जणांच्या तुकडयांमध्ये तर २५० जण उत्तराखंडच्या लिपुलेख खिंड मार्गे प्रवास करणार आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नधू ला मार्गे जाणारे भाविक २० जून रोजी भारत-चीन सीमा ओलांडतील. या गटात परराष्ट्र मंत्रालयाच्या दोन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. पर्यटन आणि नागरी हवाई वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सी. एस. राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास मानसरोवरला जाणारे भाविक काल सिलिगुडीच्या बागडोगरा विमानतळावर दाखल झाले आणि ते रस्तेमागनि गंगटोकला पोचले, पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे रेनॉक येथील एका बंगल्यात स्वागत केले.

गंगटोक येथे काल रात्री थांबलेला भाविकांचा जथा आज सकाळी प्रवासराला निपाला, गंगटोक सोडल्यानंतर या मार्गावरील १७ मैल येथे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही वेळ भाविकांचा जथा थांबला. यानंतर २० जून रोजी भारत-चीन सीमा ओलांडण्यापूर्वी हा जया सेराधांग येथे जाणार आहे. ते म्हणाले, नथू ला- कैलास मानसरोवर यात्रा हो सरकार ते सरकार (जो-टू-जी) करारानुसार आयोजित करण्यात आली आहे. या प्रवासाची जबाबदारी सिक्कीम पर्यटन विकास महामंडळावर असेल, त्यामुळे 'एसटीडीसी'ला गंगटोक ते कैलास पर्वत आणि नंतर मानसरोवरपर्यंत तसेच परतीचा प्रवास पूर्ण होईपर्यंत भाविकांची काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय भाविकांच्या गटात भारत तिबेट सीमा पोलिसचे (आयटीबीपी) जवान, एक डॉक्टर, स्वयंपाकी आणि संपर्क अधिकारी असेल, यावर्षी कैलास मानसरोबर येथे पंचरा तुकहधा रवाना होणार असून यात प्रत्येक तुकडीत ५० भाविकांचा समावेश आहे. पाच तुकड्या उत्तराखंड राज्यातील लिपुलेख खिंडीतून जातील तर दहा तुकडधा नथू ला मार्गे जातील. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter