बकरी ईदपूर्वी फडणवीसांनी घेतला कायदा-सुव्यवस्था आढावा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बकरी ईदपूर्वी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोमवारी २ जून २०२५ रोजी सायंकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत, असं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, बकरी ईदवरील प्राणी बळीच्या वादावर रविवारी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी इस्लामी तत्त्वं आणि स्थानिक कायद्यांचं पालन करून सांप्रदायिक सौहार्द राखण्याचं आवाहन केलं. “हजरत इब्राहिम यांच्या तत्त्वांचं पालन करावं. आपल्या बळीमुळे कोणालाही त्रास होऊ नये. इस्लामचा हाच संदेश आहे. आपल्या कृतीने कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत,” खान म्हणाले (ANI न्यूज एक्स पोस्ट).

“प्रशासनाला सूचना देऊ की, कोणाला आक्षेप नसेल तरच बळी द्यावा. बंधुभावाला धक्का पोहोचेल असं काही करू नये. ज्या देशात राहतो, तिथले नियम पाळावेत. महाराष्ट्रात गोमांसावर बंदी आहे, त्यामुळे गायीचा बळी देऊ नये. उंट आणि बकऱ्यांचा बळी वेगवेगळ्या देशांत दिला जातो. केवळ परवानगी असलेल्या प्राण्यांचा बळी द्यावा,” असं खान यांनी स्पष्ट केलं.

बकरी ईद, ज्याला ‘त्यागाचा सण’ म्हणतात, इस्लामी कॅलेंडरच्या धु अल-हिज्जा महिन्याच्या १०व्या दिवशी साजरी होते. हज यात्रेचा समारोप यानिमित्ताने होतो. यंदा ६ जून रोजी हा सण साजरा होण्याची शक्यता आहे.

हा सण आनंद आणि शांततेचा आहे. लोक कुटुंबासोबत उत्सव साजरा करतात, भूतकाळातील मतभेद विसरतात आणि एकमेकांशी सौहार्दाचे नाते जोडतात. हजरत इब्राहिम यांनी अल्लासाठी सर्वस्व त्यागण्याची तयारी दाखवली, याची आठवण हा सण करून देतो. 

कुरआननुसार, इब्राहिम आपल्या मुलाचा बळी देणार असताना स्वर्गातून आलेल्या आवाजाने त्यांना थांबवलं आणि दुसऱ्या प्राण्याचा बळी देण्याची परवानगी दिली. याच्या स्मरणार्थ मुस्लिम बकरी, मेंढी, गाय किंवा उंटाचा प्रतीकात्मक बळी देतात. हा बळी तीन भागांत वाटला जातो.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter