BRICS 2026: मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम भारतात दाखल. ग्रँड मुफ्ती यांच्यासोबतची भेट का आहे खास?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
ग्रँड मुफ्ती आणि मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर इब्राहिम
ग्रँड मुफ्ती आणि मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर इब्राहिम

 

नवी दिल्ली

मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर इब्राहिम भारतात दाखल झालेत. त्यांची भारत भेट अशा वेळी होतेय, नवी दिल्लीत १८ वी ब्रिक्स शिखर परिषद (BRICS Leaders’ Summit) आयोजित केली जातेय. अनवर इब्राहिम ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासोबतच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. त्यांच्या या भेटीचा खास पैलू केरळशी जोडलेला आहे. तिथे त्यांची भेट भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबक्र अहमद यांच्याशी होणार आहे. या भेटीत सामाजिक विकास, शिक्षण आणि धार्मिक विषयांवर विचारांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे.

मलेशियाच्या पंतप्रधानांनी स्वतःच्या भारत दौऱ्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांशी शेअर केलीय. मलेशियाच्या शिष्टमंडळासह आपण नवी दिल्लीसाठी रवाना झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या नियोजित कार्यक्रमात ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेण्याचा समावेश आहे.

याशिवाय भारत आणि मलेशिया यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चाही प्रस्तावित आहे. अनवर इब्राहिम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय रशिया, इराण आणि कझाकस्तानच्या राष्ट्रध्यक्षांसोबत तसंच इथिओपियाच्या पंतप्रधानांसोबतही त्यांच्या द्विपक्षीय बैठका निश्चित झाल्यात.

या दौऱ्यात केरळमधल्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. केरळमध्ये आपण भारताच्या ग्रँड मुफ्तींची भेट घेणार असल्याचं अनवर इब्राहिम यांनी सांगितलं. या काळात सामाजिक विकास, शिक्षण आणि धार्मिक प्रकरणांशी जोडलेल्या विषयांवर विचार मांडले जातील. या घोषणेनंतर केरळमध्ये या भेटीबाबत विशेष उत्सुकता पाहायला मिळतेय. विशेषतः शिक्षण आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात भारत व मलेशिया यांच्यातल्या सहकार्याच्या नव्या शक्यतांकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय.

 

भारताचे ग्रँड मुफ्ती शेख अबुबक्र अहमद यांनीही मलेशियाच्या पंतप्रधानांचं मनापासून स्वागत केलंय. भारतात आगमनानिमित्त त्यांनी अनवर इब्राहिम आणि मलेशियाच्या शिष्टमंडळाला शुभेच्छा दिल्यात.

जामिया मरकझचा अनवर इब्राहिम यांच्या कार्यक्रमात समावेश केला जाणं ही आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या मते, शिक्षण, सामाजिक विकास आणि धार्मिक प्रकरणांवर विचारांची देवाणघेवाण भारत व मलेशियातले व्यापक संबंध अधिक मजबूत करू शकते.

शेख अबुबक्र अहमद यांनी स्वतःच्या पोस्टमध्ये जामिया मरकझला भारतातल्या प्रमुख इस्लामिक संस्थांपैकी असल्याचं सांगितलं. मलेशियाच्या पंतप्रधानांच्या या भारत भेटीमुळे उच्च शिक्षण, सामाजिक सक्षमीकरण आणि सांस्कृतिक संपर्काच्या क्षेत्रात नवीन मार्ग खुले होऊ शकतात, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी विशेषतः भारत आणि मलेशियादरम्यान केरळच्या माध्यमातून भक्कम संबंध निर्माण होण्याच्या शक्यतेवर भर दिला.

अनवर इब्राहिम यांची भारत भेट केवळ ब्रिक्स परिषदेपुरती अजिबात मर्यादित नाहीये. त्यांच्या कार्यक्रमात अनेक स्तरांवर राजनैतिक चर्चेचा समावेश आहे. वाढत्या जागतिक अर्थव्यवस्थेत मलेशियासाठी विकसनशील देशांचे सहकार्य आणि बहुपक्षीय मंचांची भूमिका सतत महत्त्वाची बनत चाललीय. त्यामुळे ब्रिक्सच्या मंचावरची त्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जातेय. भारताच्या यजमानपदात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत विविध देशांचे नेते जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार, विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याशी जोडलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करताहेत.

अनवर इब्राहिम यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रस्तावित असलेली बैठकही भारत-मलेशिया संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातेय. दोन्ही देशांमधला व्यापार, शिक्षण, संस्कृती, गुंतवणूक आणि लोकांमधला परस्पर संपर्क यासारखी अनेक क्षेत्रं आधीपासूनच सहकार्याचं मुख्य केंद्र राहिली आहेत. अशा परिस्थितीत वरिष्ठ नेतृत्वाच्या चर्चेतून द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या नव्या संधी शोधल्या जाऊ शकतात.

या संपूर्ण दौऱ्यात शिक्षणाचा मुद्दा विशेष रूपाने समोर आलाय. भारत आणि मलेशिया दोन्ही देश उच्च शिक्षण तसंच कौशल्य विकासाच्या क्षेत्रात सहकार्याच्या शक्यता बाळगून आहेत. केरळची शिक्षण व्यवस्था, तिथला प्रवासी समुदाय आणि मलेशियासोबत असलेले त्यांचे जुने सामाजिक संबंध या संवादाला आणखी खास बनवतात.

अनवर इब्राहिम यांची ग्रँड मुफ्तींसोबत प्रस्तावित असलेली चर्चा शिक्षण आणि सामाजिक विकासावर ठोस स्वरूपात झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम भविष्यात संस्थात्मक सहकार्यावरही पडू शकतो.

केरळ आणि मलेशिया यांच्यात सामाजिक व सांस्कृतिक संपर्क जुना आहे. मोठ्या संख्येने केरळचे लोक मलेशियासह आग्नेय आशियातल्या देशांशी जोडलेले राहिले आहेत. यामुळे दोन्ही क्षेत्रांतल्या लोकांच्या पातळीवरही संपर्क नेहमीच भक्कम राहिलाय. याच मोलाच्या घटकामुळे अनवर इब्राहिम यांचा केरळ दौरा केवळ औपचारिक कार्यक्रम म्हणून अजिबात पाहिला जात नाहीये. भारत आणि मलेशिया यांच्यातला सामाजिक व सांस्कृतिक संपर्क अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ही संधी बनू शकते.

अनवर इब्राहिम यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांत उच्च शिक्षण, सामाजिक सक्षमीकरण आणि सांस्कृतिक संपर्काचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात, असं शेख अबुबक्र अहमद यांनी स्वतःच्या संदेशात म्हटलं.

त्यांनी विशेष करून केरळसोबतचे संबंध अधिक भक्कम होण्याची आशा व्यक्त केली. या प्रस्तावित भेटीचा रोख केवळ धार्मिक प्रकरणांपुरता मर्यादित राहणार नाही, असा स्पष्ट संकेत या निवेदनातून मिळतो. सामाजिक विकास आणि शिक्षण यासारखे व्यापक विषयही चर्चेचा मुख्य भाग असू शकतात.

मलेशियाच्या पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा पुढचा टप्पा मालदीव हा असणार आहे. भारतातले आपले सर्व राजनैतिक उपक्रम पूर्ण केल्यानंतर आपण मालदीवची राजधानी माले इथे जाणार असल्याचं अनवर इब्राहिम यांनी सांगितलं. तिथे त्यांचा अधिकृत दौरा प्रस्तावित आहे. हा दौरा मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू यांच्या निमंत्रणावरून होतोय. अशा प्रकारे अनवर इब्राहिम यांचा सध्याचा हा दौरा भारत आणि मालदीव या दोन्ही देशांसोबतच्या मलेशियाच्या संबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

भारतातल्या ब्रिक्स परिषदेदरम्यान अनवर इब्राहिम यांची उपस्थिती आणि केरळमध्ये ग्रँड मुफ्तींसोबत त्यांची प्रस्तावित भेट याकडे वेगवेगळ्या स्तरांवर पाहिलं जाऊ शकतं. एका बाजूला हा दौरा जागतिक मुत्सद्देगिरी आणि ब्रिक्सच्या मंचाशी जोडलेला आहे. दुसऱ्या बाजूला यात शिक्षण, धार्मिक संवाद, सामाजिक विकास आणि सांस्कृतिक संपर्क यासारखे महत्त्वाचे विषयही समाविष्ट आहेत. हेच खास मिश्रण या दौऱ्याला विशेष बनवतं.

विशेष करून ग्रँड मुफ्ती शेख अबुबक्र अहमद आणि अनवर इब्राहिम यांच्यातल्या या भेटीवर सर्वांचं लक्ष लागून राहील. दोन्ही बाजूंनी आधीच शिक्षण, सामाजिक विकास आणि धार्मिक प्रकरणांवर विचारांच्या देवाणघेवाणीबाबत भाष्य केलंय. या क्षेत्रांतल्या सहकार्याच्या शक्यतांवर ठोस चर्चा झाल्यास भारत आणि मलेशियातल्या गैर-सरकारी व सामाजिक स्तरावरच्या संबंधांनाही नवीन दिशा मिळू शकते.

अनवर इब्राहिम यांचा भारत दौरा अशा वेळी होतोय, ब्रिक्सचा विस्तार आणि त्याचा प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत चर्चेचा विषय बनलेला आहे. भारताच्या राजधानीत जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांच्या नेत्यांची उपस्थिती या परिषदेला खास बनवतेय. यातच मलेशियाच्या पंतप्रधानांचं केरळला जाणं आणि भारताच्या ग्रँड मुफ्तींची भेट घेणं या संपूर्ण दौऱ्याला वेगळा सामाजिक व सांस्कृतिक आयाम जोडतंय.

एकूण पाहता, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या भारत दौऱ्याचे तीन प्रमुख पैलू समोर येतात. पहिला पैलू म्हणजे ब्रिक्स शिखर परिषदेतला त्यांचा सहभाग. दुसरा पैलू म्हणजे भारताच्या वरिष्ठ नेतृत्वासोबतची द्विपक्षीय चर्चा.

तिसरा पैलू म्हणजे केरळमध्ये ग्रँड मुफ्ती शेख अबुबक्र अहमद यांच्यासोबत होणारा प्रस्तावित संवाद. या तिन्ही घटकांच्या माध्यमातून भारत आणि मलेशियाचे राजकीय, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संबंध पुढे नेण्याच्या शक्यता दिसून येतात. आता नवी दिल्ली आणि केरळमध्ये होणाऱ्या या महत्त्वाच्या भेटींमधून दोन्ही देशांच्या संबंधांसाठी कोणते नवीन मार्ग समोर येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.



Latest News