मुंबई
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या मात्र कमी परिचित असलेल्या २१ दिवसांच्या अध्यायावर चित्रपट येणार आहे. सुनावणी आणि राजकीय-सामाजिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे सुधीर मिश्रा आणि दिग्दर्शक-निर्माता अनुभव सिन्हा यांनी या नवीन चित्रपटासाठी एकत्र हात मिळवले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी या चित्रपटात महात्मा गांधींची महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
सुधीर मिश्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, 'मुल्क', 'आर्टिकल १५' आणि 'थप्पड' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे अनुभव सिन्हा त्यांच्या 'बनारस मीडिया वर्क्स' या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात सौरभ शुक्ला यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट एनएच स्टुडिओज (NH Studioz) द्वारे प्रस्तुत केला जात आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक सुधीर मिश्रा म्हणाले की, हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्याच्या काळातील एका महत्त्वपूर्ण आणि कमी माहीत असलेल्या अध्यायावर केंद्रित आहे. जेव्हा देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता आणि दिल्ली सत्तेचे केंद्र बनत होती, तेव्हा महात्मा गांधींनी एक अनपेक्षित निवड केली त्यांनी त्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, मागे हटून त्यांनी स्वतःला पुन्हा नव्याने घडवले. इतिहासाची पुस्तके वरवरच्या घटनांची नोंद करतात, पण हा चित्रपट त्या,प्रसिद्ध निर्णयामागील मानवी प्रवास आणि विचार उलगडून दाखवणार आहे.