नक्षलवादाविरोधातील लढाईत केंद्र सरकारला ऐतिहासिक यश मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांत छत्तीसगड आणि महाराष्ट्रात मिळून तब्बल २५८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या मोठ्या घडामोडीनंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी "अबुझमाड आणि उत्तर बस्तर हे एकेकाळचे दहशतीचे अड्डे आता नक्षल दहशतीपासून मुक्त झाले आहेत," अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून ही माहिती दिली. ते म्हणाले, "नक्षलवादाविरोधातील लढाईत हा एक ऐतिहासिक दिवस आहे. आज छत्तीसगडमध्ये १७० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर काल २७ जणांनी शस्त्रे टाकली होती. काल महाराष्ट्रातही ६१ जण मुख्य प्रवाहात परतले. एकूण २५८ कडव्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांनी गेल्या दोन दिवसांत हिंसाचाराचा त्याग केला आहे."
नक्सलवाद के खिलाफ लड़ाई में बड़ी सफलता!
— Amit Shah (@AmitShah) October 16, 2025
छत्तीसगढ़ में आज 170 नक्सलियों ने आत्मसमर्पण किया है, कल 27 ने हथियार डाले थे। महाराष्ट्र में भी कल 61 नक्सली हथियार त्याग कर मुख्यधारा में लौटे। पिछले दो दिनों में कुल 258 वामपंथी उग्रवादियों ने हिंसा का रास्ता छोड़ा है।
हिंसा छोड़कर…
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे नक्षलवाद आता शेवटची घटका मोजत आहे, हेच यातून सिद्ध होते. आमचे धोरण स्पष्ट आहे: ज्यांना शरण यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे आणि जे शस्त्र उचलतील, त्यांना आमच्या सुरक्षा दलांच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल," असा इशाराही त्यांनी दिला.
शरण आलेल्यांमध्ये १० वरिष्ठ नक्षली नेत्यांचा समावेश आहे. यात सतीश उर्फ टी. वासुदेव राव (CCM) याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. याशिवाय, माड डिव्हिजनची सचिव रनिता (SZCM), भास्कर (DVCM), नंदे (DVCM) आणि दीपक पालो (DVCM) यांसारख्या मोठ्या कमांडरचाही समावेश आहे. या सर्वांनी AK-47, INSAS, SLR आणि .303 रायफल्ससारख्या मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आ
अमित शहा यांनी सांगितले की, छत्तीसगडमध्ये जानेवारी २०२४ पासून भाजपचे सरकार आल्यानंतर, आतापर्यंत २१०० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, १७८५ जणांना अटक करण्यात आली आहे आणि ४७७ जणांना चकमकीत ठार करण्यात आले आहे. "हे आकडे ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद संपवण्याच्या आमच्या सरकारच्या दृढ संकल्पाचे प्रतिबिंब आहेत," असे ते म्हणाले.