DIMAGI NAXAL: 'दिमागी नक्षलवाद्यां'वरून भाजप आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी; रिजिजू म्हणाले, विरोधकांचा समावेश नाही

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 4 h ago
किरेन रिजिजू
किरेन रिजिजू

 

नवी दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या 'दिमागी नक्षलवादी' (वैचारिक नक्षलवादी) या विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार वाद निर्माण झाला आहे. या वादावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना 'दिमागी नक्षल' म्हटले नव्हते, तर जे लोक माओवाद्यांचे समर्थन करतात आणि भारतीय संविधानाचा अस्वीकार करतात, त्यांनाच हा उद्देशून म्हटले होते.

लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी यंत्रणेत घुसखोरी करून धोरणांची दिशाभूल करणाऱ्या 'दिमागी नक्षलवाद्यां'पासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. या वक्तव्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत लोकशाहीतील असहमतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी तर "मला 'दिमागी नक्षल' असल्याचा अभिमान आहे," असे सोशल मीडियावर म्हटले होते.

भाजपचा विरोधकांवर निशाणा

किरेन रिजिजू यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर स्पष्टीकरण देताना म्हटले की, जे लोक काश्मीरमधील कलम ३७० चे समर्थन करतात, ईशान्य भारताला देशापासून वेगळे करण्याची भाषा करतात, तेच खरे 'दिमागी नक्षल' आहेत. दरम्यान, चिदंबरम यांच्या विधानावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी तीव्र शब्दांत टीका केली असून, यूपीए सरकारच्या काळात नक्षलवादाला कसे खतपाणी घातले गेले, असा सवाल उपस्थित केला आहे.



Latest News