१९ वर्षानंतर बंगाली लेखिका तसलिमा नसरीन यांचे कोलकात्यात पुनरागमन; साहित्य आणि राजकीय वर्तुळात चर्चा.

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 4 h ago
लेखिका तसलिमा नसरीन
लेखिका तसलिमा नसरीन

 

कोलकाता

निर्वासित बंगाली लेखिका तसलिमा नसरीन यांनी तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी कोलकात्यात पुनरागमन केले आहे. या भेटीला आपण आपले स्वतःचे घर आणि भावनिक पुनरागमन मानत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील नव्या भाजप सरकारच्या काळात आयोजित एका साहित्यिक कार्यक्रमापूर्वी त्यांचे हे आगमन झाले असून, या दौऱ्याला मोठे राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर हात जोडून उपस्थितांचे अभिवादन करताना तसलिमा नसरीन म्हणाल्या की, परत आल्यावर मला खूप आनंद होत आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये हिंसक निदर्शनांनंतर त्यांना शहर सोडावे लागले होते, त्यानंतर त्यांची ही पहिलीच कोलकाता भेट आहे. शनिवार रविवाराच्या दरम्यान रवींद्र सदन येथे आयोजित एका दहशतवादविरोधी साहित्यिक कार्यक्रमात त्या पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या उपस्थित राहून कविता वाचन करणार आहेत. मुख्यमंत्री सुवेदू अधिकारी आणि ख्यातनाम लेखक शीर्षेंदु मुखोपाध्याय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

भूतकाळातील आठवणी आणि राजकीय पार्श्वभूमी

१९९४ मध्ये 'लज्जा' कादंबरीवरून मिळालेल्या धमक्यांमुळे बांगलादेश सोडल्यानंतर तसलिमा यांनी २००४ मध्ये कोलकात्यात आश्रय घेतला होता. मात्र, २००७ मध्ये त्यांच्या 'द्विखंडितो' पुस्तकावरील वादानंतर आणि वाढत्या निदर्शनांमुळे तत्कालीन डाव्या सरकारने त्यांना शहर सोडण्यास सांगितले होते. जवळजवळ दोन दशके हा लढा चालल्यानंतर, आता नव्या राजकीय वातावरणात त्यांचे पुनरागमन झाले आहे. धार्मिक अतिरेकाविरुद्धचा आवाज बुलंद करणाऱ्या या लेखिकेच्या स्वागतामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.



Latest News